श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या तब्बल १६० मावळ्यांनी कोयना धरणातील सर्वात उंच बेट किल्ला वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकजण ज्या भावनेने एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच प्रेरणेने मावळ्यांनी ‘मी अवयव दान व रक्तदान करणार’ अशी हृदयस्पर्शी शपथ घेतली.   शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या काठी बामनोली येथे कॅम्पिंग करण्यात आले. रविवारी सकाळी ४५ मिनिटांच्या जलप्रवासानंतर सर्व ...

महाराष्ट्रातील दगडी पायऱ्यांच्या ऐतिहासिक बारवांचा वारसा जतन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’ ला आज नवसंजीवनी मिळाली आहे. मोहिमेचे राज्य मुख्य समन्वयक रोहन काळे (मुंबई) यांनी अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नियुक्तीची घोषणा करताच जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.   राजेश इंगळे हे उत्तम गडकिल्ले ट्रेकर, वारसा अभ्यासक, संवर्धक आणि “किल्ले दाखविणारा माणूस” म्हणून ...

सह्याद्रीच्या कठीण घनदाट अरण्यात, कोयना–जावळीच्या गभीर खोऱ्यात वसलेला वासोटा किल्ला अलीकडेच इतिहासप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या ९६व्या गडकिल्ले मोहिमेद्वारे पानिपत वीरांच्या वारसा संवर्धनासाठीची ‘एक सही’ मोहीम अभिमानाने पार पडली.   अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत ५२ शिलेदारांनी सहभाग घेतला. वासोटाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निष्ठेने गडपूजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे आपली स्वाक्षरी करून पानिपत वीरांचा इतिहास ...

जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेने भारावून गेले, कारण इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंगलेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली १७०० वी उसंतवाणी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी अर्पण केली. आध्यात्म, इतिहास, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक ...

         श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी, शौर्य आणि शिंदेशाही परंपरेचा वारसा लाभलेली धरती! मात्र हा ऐतिहासिक वारसा आज अत्यंत विदारक अवस्थेत आहे. शहरातील राजवाडे, वेशी, समाधीस्थळे, बारवा ही स्मारके मोडकळीस आलेली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वारशाचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ संचलित ‘शिवदुर्ग वारसा संवर्धन ...