श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा ही पानिपत वीरांची भूमी, शौर्य आणि शिंदेशाही परंपरेचा वारसा लाभलेली धरती! मात्र हा ऐतिहासिक वारसा आज अत्यंत विदारक अवस्थेत आहे. शहरातील राजवाडे, वेशी, समाधीस्थळे, बारवा ही स्मारके मोडकळीस आलेली असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वारशाचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन’ संचलित ‘शिवदुर्ग वारसा संवर्धन ...