श्रीगोंदा | दि. 27 मे 2026 गणेश कविटकर मांडवगण-श्रीगोंदा मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, परिसरातील ऐतिहासिक व पुरातन “काशीबारव” सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. वारसा संवर्धनासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या जनजागृती, पाठपुरावा आणि संघर्षाला अखेर यश मिळाल्याने इतिहासप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काशीबारव परिसरात पुन्हा रस्ता खोदकाम सुरू झाल्यानंतर बारवेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात ...

भागवत धर्माचा निष्ठावंत वारकरी, संगीतसेवेचा अखंड दीप मालवला अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी आणि भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता. २३) वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, वारकरी संप्रदाय आणि संगीत क्षेत्राने एक अभ्यासू, सेवाभावी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ...

लोणी व्यंकनाथमध्ये वाढदिवस साजरा झाला समाजहिताच्या संकल्पांनी; विविध सामाजिक उपक्रमांनी ग्रामस्थ भारावले श्रीगोंदा : दि. 26 मे 2026 गणेश कविटकर आजच्या दिखाऊ आणि खर्चिक वाढदिवसांच्या काळात लोणी व्यंकनाथ येथे एका वाढदिवसाने समाजासमोर आदर्श निर्माण केला. जैन महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त “जागर युवा प्रतिष्ठान” या सामाजिक संघटनेचे उद्घाटन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले. हा सोहळा केवळ ...

विसापूर : दि. 25 मे 2026 गणेश कविटकर “दत्तात्रय गावडे गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर महेश्वर पतसंस्था व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थेने १७ शाखांचा विस्तार करत तब्बल ३४० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी विश्वासपात्र आणि सर्वसामान्यांच्या हिताची आहे,” असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काढले. विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट ...

आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत रामदास झेंडे मित्रमंडळाचा समाजाला आदर्श संदेश श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर आयुष्यभर कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला देणाऱ्या ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. माता लिलाबाई झेंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास झेंडे मित्रमंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील तब्बल १६३ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या ...

UPSC मधून केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती; रेसिडेन्शियल हायस्कूलतर्फे विशेष गौरव श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर अहिल्यानगर : “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या सुविधा किंवा आर्थिक बळाची गरज नसते; जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झालेले महेश ...

कर्तृत्ववान आयपीएस धनंजय कुलकर्णी यांच्यावर मुंबई पूर्व विभागाची धुरा….   श्रीगोंदा  | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : तालुक्यातील भानगाव या ग्रामीण मातीतून उभारी घेत देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलीस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय ...

श्रीगोंदा | दि. 10 मे 2026 गणेश कविटकर जनगणना 2027 अंतर्गत ग्रामीण भागातील घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांचे 12 दिवसीय प्रशिक्षण शिबिर श्रीगोंद्यातील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 16 मे ते 14 जून दरम्यान पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कामकाजासाठी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 597 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील बंद पडलेले अथवा अडचणीत सापडलेले तब्बल 17 साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले असून, सुमारे 11 लाख ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना आर्थिक न्याय देण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे केवळ एका महिन्याचे ऊस बिल ...

तरुण पिढीने पानिपतचा वारसा जपावा – मराठा राजेश कल्याण यांचे आवाहन श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात महाराष्ट्रातून हरियाणात गेलेल्या आणि तेथेच स्थायिक झालेल्या मराठा वीरांच्या वंशजांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राशी भावनिक नाळ जोडण्यासाठी “पानिपत महाराष्ट्र संपर्क अभियान” अंतर्गत श्रीगोंदा शहराला भेट दिली. इतिहास, पराक्रम आणि बंधुत्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा हा दौरा श्रीगोंदेकरांसाठी प्रेरणादायी ...