श्रीगोंदा | दि. 06 एप्रिल 2026 गणेश कविटकर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संगठन सृजन अभियान अंतर्गत श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नियुक्त निरीक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी देत असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीस मुख्य निरीक्षक सरत राऊट, ज्येष्ठ नेते ...
दरवाढ तात्काळ मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा | दि. 13 मार्च 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शासनाने केलेल्या वाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध ...
श्रीगोंदा | दि. २३ जानेवारी गणेश कविटकर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात इतिहासात प्रथमच महिलेला संधी… सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या व्हाईस चेअरमन पदावर सौ. मेघा संदीपराव औटी यांची एकमताने निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि कारखान्याच्या ५१ व्या ऐतिहासिक गळीत हंगामात प्रथमच एका महिलेला व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त ...
श्रीगोंदा | दि. १९ जानेवारी २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नवनिर्वाचित झालेल्या अलका अनभुले यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या साध्या मात्र उत्साहपूर्ण कार्यक्रमात त्यांनी पदभार स्वीकारत श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना अलका अनभुले म्हणाल्या की, शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा ...
श्रीगोंदा | दि. १६ जानेवारी २०२६ गणेश कविटकर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती श्रीगोंदा सन २०२६ च्या नियोजनासाठी आज श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सौ. मीराताई खेडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी उपाध्यक्षपदी चेतना मांगडे यांची निवड करण्यात ...
श्रीगोंदा नगरपालिकेला नवी दिशा; पदभार स्वीकारताना ठाम राजकीय संदेश… श्रीगोंदा : “नगराध्यक्षपद ही सत्तेची खुर्ची नसून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे साधन आहे,” असे ठाम आणि परखड शब्दांत सांगत सुनिता संतोष खेतमाळीस यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सामान्य जनतेच्या विश्वासावरच आपली राजकीय वाटचाल उभी राहील, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी दुःखापासून सुखापर्यंत कायम पाठिशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता ...
श्रीगोंदा (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महान उद्योजक रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंध उद्योजक भावेश भाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त अग्नीपंख फाउंडेशन, श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा ते नायगाव अशी तब्बल १३७ किलोमीटरची ‘प्रेरणा सायकल वारी’ उत्साहात पार पडली. या उपक्रमाचा समारोप नायगाव येथे करण्यात आला. यावेळी उद्योजक व महिला खेळाडूंचा सन्मान, तसेच ‘उद्योग विश्वातील रिअल हिरो’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात ...
वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ ...
लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना…. श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...









