छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी प्रवास : किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड श्रीगोंदा | दि. 21 फेब्रुवारी 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पराक्रम, त्याग आणि धर्मनिष्ठेची साक्ष देणाऱ्या भूमीतून यंदा पुन्हा एकदा धर्मवीरांचा जयघोष दुमदुमला. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील किल्ले धर्मवीरगडावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने ...
श्रीगोंदा | दि. १९ फेब्रुवारी २०१६ गणेश कविटकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारव दीपोत्सव – पाचवे वर्ष उत्साहात साजरे श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत यंदाच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर राज्यभरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर परिसर श्रीगोंदा, काशीबारव (मांडवगण रोड) व बेलवंडी ...
पानिपत वीरांच्या स्मृतींना अभिवादन; वारसा संवर्धनाचा जागर श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराच्या उत्तर वेसजवळ असलेली, पानिपतच्या रणभूमीशी नाते सांगणारी ऐतिहासिक दिल्ली वेस ही शिंदेशाही ज्वलंत इतिहासाची साक्ष आहे. या दुर्लक्षित पण मौलिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी श्रमदानातून नववर्षाचे स्वागत ...
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे. साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...
शिवदुर्गची शिवशौर्य गाथा : महाराष्ट्रातील सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावर ऐतिहासिक व प्रेरणादायी मोहिम
महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली. बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...
श्रीगोंदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयातच आपल्या इतिहासाची, निसर्गाची आणि वारशाची ओळख करून देण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूंजवस्ती (टाकळी कडे) शाळेत राबविण्यात आला. पहिली ते चौथीतील एकूण २३ विद्यार्थ्यांना साकळाई व महिंदेश्वर डोंगररांगेत मिनी ट्रेकिंग घडवून आणत छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त डोंगरसंस्कृतीचे बाळकडू देण्यात आले. सकाळच्या प्रहरी सुरू झालेल्या या अभ्यास सहलीत ...
श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या तब्बल १६० मावळ्यांनी कोयना धरणातील सर्वात उंच बेट किल्ला वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकजण ज्या भावनेने एकमेकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच प्रेरणेने मावळ्यांनी ‘मी अवयव दान व रक्तदान करणार’ अशी हृदयस्पर्शी शपथ घेतली. शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या काठी बामनोली येथे कॅम्पिंग करण्यात आले. रविवारी सकाळी ४५ मिनिटांच्या जलप्रवासानंतर सर्व ...
महाराष्ट्रातील दगडी पायऱ्यांच्या ऐतिहासिक बारवांचा वारसा जतन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र बारव मोहिमे’ ला आज नवसंजीवनी मिळाली आहे. मोहिमेचे राज्य मुख्य समन्वयक रोहन काळे (मुंबई) यांनी अहिल्यानगर जिल्हा समन्वयक म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नियुक्तीची घोषणा करताच जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राजेश इंगळे हे उत्तम गडकिल्ले ट्रेकर, वारसा अभ्यासक, संवर्धक आणि “किल्ले दाखविणारा माणूस” म्हणून ...
सह्याद्रीच्या कठीण घनदाट अरण्यात, कोयना–जावळीच्या गभीर खोऱ्यात वसलेला वासोटा किल्ला अलीकडेच इतिहासप्रेमींच्या जयघोषाने दुमदुमला. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या ९६व्या गडकिल्ले मोहिमेद्वारे पानिपत वीरांच्या वारसा संवर्धनासाठीची ‘एक सही’ मोहीम अभिमानाने पार पडली. अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत ५२ शिलेदारांनी सहभाग घेतला. वासोटाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निष्ठेने गडपूजन झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे आपली स्वाक्षरी करून पानिपत वीरांचा इतिहास ...
जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेने भारावून गेले, कारण इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंगलेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली १७०० वी उसंतवाणी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी अर्पण केली. आध्यात्म, इतिहास, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक ...









