शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे.   साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...

लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना….   श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी कृषी पंपासाठी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंपांची वीजपुरवठा लाईट दिवसा करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज श्रीगोंदा येथील महावितरण (एमएसईबी) अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडत, बिबट्याच्या हल्ल्याची भीती लक्षात घेता रात्रीच्या ...

महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.   बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...

हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाने परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.   कारखान्यातून दररोज बाहेर पडणारी काळी राख ...

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे 2009 सालच्या बारावी कला बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे जाज्वल्य उदाहरण घालत 117 पुस्तकांची मूल्यवान भेट दिली. अंदाजे 20,000 रुपयांच्या किंमतीची ही पुस्तके विद्यालयाच्या ग्रंथालयाला सप्रेम अर्पण करण्यात आली असून, ग्रंथालय समृद्धीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल मानले जात आहे. या उपक्रमात किशोर गुंजाळ, ...

 अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्ततुटवड्याची तातडीची गरज ओळखत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती यांच्या वतीने घारगाव येथे सहावे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. श्रीगोंदा, घारगाव, काष्टी, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी बु. या परिसरातील नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग मिळत एकूण ५२ पिशव्या रक्तदानाचा अमूल्य साठा निर्माण झाला.   रक्तदान शिबिराचे उद्घाटन रमेश कळमकर, शरद खोमणे, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र भापकर, निखिल ...

           राज्यातील अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी समाजाने हात पुढे करणे ही काळाची गरज असताना, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे.              इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चर (ICCOA) च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ₹53,000 देणगीचा धनादेश प्रदीप सकट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात ...

हिरडगाव, ता. श्रीगोंदा — दुर्लक्षित, मागास आणि मर्यादित साधनसामग्री असलेली चिंचकुट वस्ती शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते… हा बदल घडवून आणला तो अग्नीपंख फाउंडेशनच्या ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ या उपक्रमाने. लोकसहभाग आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.   लोकार्पण सोहळा उत्साहात –   सुधारणांचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश ...