मुळशी तालुक्यातील भानुदास पानसरे यांच्यासह उबाठाचे अनेक पदाधिकारीही भाजपामध्ये     पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या असंख्य समर्थकांसह शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पुण्यातील उबाठा गटाचे डॉ. अमोल देवडेकर आणि हडपसरचे प्रशांत तुपे यांच्यासह ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग क्रमांक ७ ब मधील मतदान प्रक्रिया ...

श्रीगोंदा : प्रभाग क्रमांक ७ ब मधील निवडणूक प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष व नगरसेवक असताना लक्ष्मी नगर, इंदिरा नगर, हनुमान नगर, साई नगर, रविवार पेठ व कुंभारगल्ली येथील रस्ते तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटची महत्त्वपूर्ण कामे केल्याची माहिती मतदारांना दिल्यानंतर, आमदार विक्रम पाचपुते यांनी सदर कामे आपणच केल्याचा दावा प्रसारमाध्यमांत केल्याने माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यावर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. ...

‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.  त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी ...

मुंबई, दि. १८:- शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री, महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ. राम सुतार यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांत्वना दिली.   मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, रामभाऊंच्या ...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खात्यामार्फत राज्यभर सुरू असलेल्या वेगवान विकासकामांचा थेट लाभ श्रीगोंदा शहराला मिळत असून, शहरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडून येत आहेत. या विकासकामांच्या जोरावर शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.   जुना प्रभाग क्रमांक ४ (सध्याचा प्रभाग क्रमांक ७) येथे नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कार्यरत असताना रस्ते, गटारी, नागरी सुविधा आदी मूलभूत ...

सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने चालू ५१ व्या गळीत हंगामात सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ३१५० रुपये प्रतिमेट्रिक टन ऊस दर देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता ३००० रुपये तात्काळ देण्यात येणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीपर्यंत अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली. ...

महाराष्ट्राच्या सह्याद्रीत दिमाखाने उभा असलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जाणारा साल्हेर किल्ला पुन्हा एकदा शिवशौर्याचा साक्षीदार ठरला. सह्याद्रीतील गडकोटांची अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक व संवर्धनात्मक भटकंती करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने शिवदुर्गची ९७ वी गडकिल्ले अभ्यास मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण केली.   बारामती, श्रीगोंदा, शिरूर, नगर व पुणे जिल्ह्यातील ३६ शिवप्रेमी सदस्यांनी शिवदुर्गचे अध्यक्ष ...

हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्यामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाने परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.   कारखान्यातून दररोज बाहेर पडणारी काळी राख ...

•९० हजार ब्रास जादा उत्खनन • कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश   नागपूर, दि. १२ डिसेंबर २५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. ...