श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवत श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) पदावर मयुर गोरखे यांची बिनविरोध निवड करून राजकीय वर्चस्व अधोरेखित केले. पूर्वी हे पद बबन श्रीराम यांच्याकडे होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. नव्या निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार ...

जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेने भारावून गेले, कारण इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंगलेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली १७०० वी उसंतवाणी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी अर्पण केली. आध्यात्म, इतिहास, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक ...

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य, स्पर्धात्मक व रास्त दर मिळावा, वजनातील फसवणूक थांबावी आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत या उद्देशाने श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळे येथील उपबाजार आवारात भुसार मालाच्या खरेदी-विक्री लिलावास अधिकृत सुरूवात करण्यात आली. समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी ही माहिती दिली. गुरुवार व रविवार अशा आठवड्यात दोन दिवस लिलावाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनाच्या दिवशीच मका, बाजरी, गहू ...

शिरपूर – आगामी शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्धोक पार पाडण्यासाठी आयोजित मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्ग भंडारी सभागृह, शिरपूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. या निवडणुकीसाठी एकूण 400 मतदान कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले असून यापैकी 350 कर्मचारी उपस्थित होते, तर 50 कर्मचारी गैरहजर राहिले. अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील ...

राहुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप ओबीसी सेलचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस नारायण नंदकुमार धोंगडे यांच्या जनसंपर्क मोहमीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजकारणातून विकास साधण्याचा त्यांचा प्रयत्न वॉर्डात चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून धोंगडे यांनी गरजू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. भोजनदान, आरोग्य सहाय्य, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग, ...

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगरच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर रामभाऊ काळाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार, माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यासभेत ही निवड पार पडली. शाळेच्या विकासाबरोबरच माजी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि नव्या उपक्रमांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काळाणे यांची निवड महत्वाची मानली जात आहे. सभेदरम्यान संघटनेच्या कार्याचा आढावा ...

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर; तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील नागरी/ग्रामीण बिगरशेती/सेवक सहकारी पतसंस्थांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार ...

           राज्यातील अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी समाजाने हात पुढे करणे ही काळाची गरज असताना, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आले आहे.              इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चर (ICCOA) च्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ₹53,000 देणगीचा धनादेश प्रदीप सकट यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात ...

भारतीय औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची ठरणारी कामगिरी करत चैतन्य हेवी इक्विपमेंट्स या प्रतिष्ठित कंपनीला ह्युंदाईतर्फे ‘सर्वात मोठा जागतिक डीलर’ म्हणून गौरविण्यात आले. २०२५ मधील जागतिक डीलर सल्लागार समिती (Global Dealer Advisory Committee) बैठकीत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याने भारतीय उद्योगजगताचा नावलौकिक वाढवला आहे. या महत्त्वपूर्ण यशाचा श्रेय कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रगतीला, गुणवत्तापूर्ण सेवांना आणि ग्राहक व भागीदारांच्या मजबूत विश्वासाला जाते. चैतन्य हेवी ...

हिरडगाव, ता. श्रीगोंदा — दुर्लक्षित, मागास आणि मर्यादित साधनसामग्री असलेली चिंचकुट वस्ती शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते… हा बदल घडवून आणला तो अग्नीपंख फाउंडेशनच्या ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ या उपक्रमाने. लोकसहभाग आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.   लोकार्पण सोहळा उत्साहात –   सुधारणांचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश ...