पानिपत वीरांच्या स्मृतींना अभिवादन; वारसा संवर्धनाचा जागर     श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराच्या उत्तर वेसजवळ असलेली, पानिपतच्या रणभूमीशी नाते सांगणारी ऐतिहासिक दिल्ली वेस ही शिंदेशाही ज्वलंत इतिहासाची साक्ष आहे. या दुर्लक्षित पण मौलिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी श्रमदानातून नववर्षाचे स्वागत ...

श्रीगोंदा नगरपालिकेला नवी दिशा; पदभार स्वीकारताना ठाम राजकीय संदेश…   श्रीगोंदा : “नगराध्यक्षपद ही सत्तेची खुर्ची नसून लोकशाही अधिक मजबूत करण्याचे साधन आहे,” असे ठाम आणि परखड शब्दांत सांगत सुनिता संतोष खेतमाळीस यांनी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सामान्य जनतेच्या विश्वासावरच आपली राजकीय वाटचाल उभी राहील, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी दुःखापासून सुखापर्यंत कायम पाठिशी उभे राहिलेल्या पाचपुते कुटुंबाबद्दल कृतज्ञता ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महान उद्योजक रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त तसेच अंध उद्योजक भावेश भाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त अग्नीपंख फाउंडेशन, श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा ते नायगाव अशी तब्बल १३७ किलोमीटरची ‘प्रेरणा सायकल वारी’ उत्साहात पार पडली. या उपक्रमाचा समारोप नायगाव येथे करण्यात आला. यावेळी उद्योजक व महिला खेळाडूंचा सन्मान, तसेच ‘उद्योग विश्वातील रिअल हिरो’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात ...

चिखली (ता. श्रीगोंदा) : पाणीटंचाईवर मात करत गावाच्या शाश्वत विकासाकडे नेणारा प्रेरणादायी उपक्रम चिखली येथे साकार झाला आहे. पुणे येथील रेलफॉर लॅब्ज व सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि.चे सर्वेसर्वा, प्रसिद्ध उद्योगपती दीपक नाथानी यांच्या सेवादीप फाउंडेशनच्या माध्यमातून चिखली गावातील पुष्पतलाव व विजयतलाव या दोन तलावांचे गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. या जलसंधारण कामांचे लोकार्पण उद्योगपती दीपक नाथानी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार ...

श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, कारखान्याच्या अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक तसेच गौरी शुगर कारखान्यामुळे होणाऱ्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात आणि स्व. कुणाल दरेकर यांच्या अपघात मृत्यू प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामस्थांनी हिरडगाव फाटा येथे तीव्र रास्तारोको आंदोलन केले. शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. ...

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांना गडकिल्ले संवर्धन, पुरातन वारसा जतन, बारव संवर्धनासाठी समाजात करत आसलेल्या अद्वितीय कार्याबद्दल साईभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९ वर्षांनंतर स्थानिक पातळीवर दखल घेऊन मिळालेला हा पहिला मोठा सन्मान आहे.   साईसेवा बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण संचलित हंगेश्वर प्लब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने समाजात अद्वितीय समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा येथील सरस्वती नदीच्या तीरावर वसलेल्या मैनाबाई माळावर असलेल्या शिंदे घराण्यातील ऐतिहासिक छत्री व समाधी स्थळांची शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देताना सलग चौथ्या वर्षी ही वारसा स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील गडकिल्ले, बारव, समाधी स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेचा ...

वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ ...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार • विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारणार • प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापणार, नोकरीतही प्राधान्य देणार • प्रकल्पबाधितांना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार मुंबई, दि. 23 – पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर ...

लोकशाहीला नवा आदर्श देणारी व समाजाला दिशा दाखवणारी श्रीगोंद्याची घटना….   श्रीगोंदा ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते. संत, महात्मे आणि समाजप्रबोधनाच्या विचारांची सोज्वळ परंपरा लाभलेल्या या भूमीतून पुन्हा एकदा लोकशाहीचा खरा अर्थच नव्हे, तर समाजाला योग्य दिशा देणारी प्रेरणादायी घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजाभाऊ लोखंडे यांचा निवडणुकीत अवघ्या १ मताने पराभव झाला. ...