श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग क्रमांक ७ ब मधील मतदान प्रक्रिया ...

श्रीगोंदा : प्रभाग क्रमांक ७ ब मधील निवडणूक प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष व नगरसेवक असताना लक्ष्मी नगर, इंदिरा नगर, हनुमान नगर, साई नगर, रविवार पेठ व कुंभारगल्ली येथील रस्ते तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटची महत्त्वपूर्ण कामे केल्याची माहिती मतदारांना दिल्यानंतर, आमदार विक्रम पाचपुते यांनी सदर कामे आपणच केल्याचा दावा प्रसारमाध्यमांत केल्याने माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यावर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. ...

‘राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील,असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.  त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी ...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास खात्यामार्फत राज्यभर सुरू असलेल्या वेगवान विकासकामांचा थेट लाभ श्रीगोंदा शहराला मिळत असून, शहरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल घडून येत आहेत. या विकासकामांच्या जोरावर शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.   जुना प्रभाग क्रमांक ४ (सध्याचा प्रभाग क्रमांक ७) येथे नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कार्यरत असताना रस्ते, गटारी, नागरी सुविधा आदी मूलभूत ...

•९० हजार ब्रास जादा उत्खनन • कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर निर्देश   नागपूर, दि. १२ डिसेंबर २५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. ...

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने गेल्या एका वर्षात घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम ...

श्रीगोंदा – नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान केंद्रांबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. निवडणूक विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 79.84% मतदान झाले आहे.   बहुचर्चित श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. शहरातील ३२ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात मतदानाचा वेग मंदावलेला दिसला. ...

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- गेल्या साडेसात वर्षांत राबवलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मंगळवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेच्या पॅनेलला नगराध्यक्ष पदा सह सर्व २२ जागांवर विजय मिळवून द्या, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.   पोटे म्हणाले, “उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत श्रीगोंद्याचा विकास जिल्ह्यात नावलौकिक निर्माण करणारा ...

श्रीगोंदा – स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आकार घेत असताना अपक्ष उमेदवार आणि भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयश्री कोथिंबीरे यांनी शिवसेना उमेदवारांना दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरसेवक पदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र “भाजप प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य मान देण्यात कमी पडते” असे म्हणत त्यांनी शिवसेना उमेदवार भामाताई कोथिंबीरे आणि बाबू धुमाळ ...

भाजपच्या प्रचार शुभारंभात झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर थेट निशाणा साधला. “माझ्यावर नेत्यांना फसवल्याचा आरोप करणाऱ्या आमदारांनी स्वतः १९८० ते २०१४ दरम्यान किती पक्ष बदलले, किती नेत्यांना फसवले आणि दरवेळी कोणती नवे चिन्हं स्वीकारली, याचा आरशात पाहून विचार करावा,” अशी कडक टीका पोटे यांनी माध्यमांशी बोलताना केली.   भाजपच्या पॅनल शुभारंभावेळी ...